महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-2019
शासन निर्णय दि.27/12/2019 अन्वये योजनेची अंमलबजावणी करण्यात आली आहे. सदर योजनेमध्ये पीक कर्ज व पुनर्गठित/फेरपुनर्गठित पीक कर्जाची रुपये दोन लाखापर्यतची थकबाकी असलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. दि. 01/04/2015 ते 31/03/2019 मध्ये वितरीत व दि. 30/09/2019 रोजी थकित असलेली पीक कर्जे व पुनर्गठित पीक कर्जांचे हप्ते योजनेस पात्र आहेत. योजनेअंतर्गत 32.37 लाख शेतक-यांना रक्कम रु. 20497 कोटी लाभ देण्यात आला आहे.
लाभार्थी:
शेतकरी
फायदे:
या योजनेअंतर्गत, थकीत पीक कर्ज आणि पुनर्गठित पीक कर्ज असलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांना ₹2 लाखांपर्यंत कर्जमाफी दिली .
अर्ज कसा करावा
अर्ज करण्याची प्रक्रिया संपली आहे.