छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना-2017
शासन निर्णय दिनांक 28.06.2017 अन्वये अंमलबजावणी सुरु झाली. सदर योजनेचा कालावधी दिनांक 01.04.2001 ते 31.03.2016 असा असुन योजनेमध्ये रु. 1.50 लाखापर्यतच्या थकबाकीस कर्जमाफी, रु. 1.50 लाखावरील थकबाकीसाठी एकवेळ समझोता योजना व सन 2015-16 व सन 2016-17 मधील नियमीत कर्जपरतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना रु. 25 हजार पर्यत अनुदान देण्यात आलेले आहे.
या योजनेमध्ये कर्जमाफीसाठी 24.88 लाख शेतकऱ्यांना रु. 13705 कोटीचा, एकवेळ समझोता योजनेमध्ये 4.27 लाख शेतकऱ्यांना रु. 2630 कोटीचा एकुण व प्रोत्साहनपर अनुदानामध्ये 14.89 लाख शेतकऱ्यांना रु. 2427 कोटीचा असा एकुण 44.04 लाख लाभार्थ्यांना रु. 18762 कोटीचा लाभ देण्यात आलेला आहे. सदर योजनेअंतर्गत 6.56 लाख कर्जखात्यांना रु. 5975.61 कोटी रकमेचा लाभ देणे बाकी आहे.
लाभार्थी:
शेतकरी
फायदे:
या योजनेअंतर्गत, १.५० लाख रुपयांपर्यंतच्या थकबाकीदारांना कर्जमाफी देण्यात आली.
अर्ज कसा करावा
अर्जाचा टप्पा संपला आहे.